Business & Finance news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर May 19, 2026
    डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी दुर्घटना घडली. साखरपुड्याच्या सोहळ्यासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकला कंटेनरने समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघांचा धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान मृत […]
  • Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक May 19, 2026
    मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा. कल्वर्टच्या पातमुखाला मजबूत (टिकावू) जाळ्या बसवाव्यात. जेणेकरून लोकवस्तीतून पावसाच्या पाण्याबरोबर येणारा कचरा नाल्यांमध्ये अडकणार नाही. तसेच पातमुखाला अडकलेला कचरा काढून पावसाळ्यापूर्वी सर्व कल्वर्टची स्वच्छता करावी. रेल्वे रुळांवर आणि रेल्वे स्थानक […]
  • Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम May 19, 2026
    मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि रिक्षा, वाहनांच्या आडून होणारे गैरप्रकार, नागरिकांना आणि विशेषतः महिलांना होणारा त्रास या बाबींची अतिशय गांभीर्याने दखल घेत, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना पाचारण करून थेट सुधा पार्क परिसरात धडक दिली. यावेळी अनधिकृतरित्या रस […]
  • Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया! May 19, 2026
    मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनात प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यावे आणि 'राष्ट्रप्रथम' या भावनेने एकसंधपणे उभे राहावे," असे जाहीर आवाहन मुख्यमंत्र […]
  • Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही May 19, 2026
    मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मात्र भारत सरकारने अडचणींतून मार्ग काढला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांशी संवाद सुरू ठेवून भारताने देशातला इंधन, गॅस, सिलेंडर आदीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामुळेच महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, L […]