Maharashtra state news- Marathi

Click here for Free NRI Matrimony Listing App
  • गोवा पब आग दुर्घटना; २५ जणांची ओळख पटली December 8, 2025
    पणजी : गोव्याच्या अर्पोरा परिसरातील Birch by Romeo Lane या पबमध्ये रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला. या दुर्घटनेत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यात ५ पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. यातील मृतांची ओळख पटली असून यामध्ये २० जण पबमधील कर्मचारी आणि ५ पर्यटक आहेत. मृतांची नावे :  १) मोहित: झारखंड : स्टाफ २) प्रद […]
  • सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मार्केट करेक्शन! आयटीमुळे आणखी गडगडण्यापासून वाचला पण‌.... सेन्सेक्स ८४ व निफ्टी २९.३० अंकाने घसरला December 8, 2025
    मोहित सोमण: सकाळी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात किरकोळ घसरण होताना दिसत आहे. प्रामुख्याने शेअर बाजारातील ही घसरण जगभरातल्या शेअर बाजारातील प्राईज करेक्शन चिन्हांकित करत आहे. युएस बाजारातील बॅक टू बॅक वाढीनंतर घसरणीकडे कौल सुरु झाल्यानं आशियाई बाजारासह भारतीय शेअर बाजारात आज सपाट अथवा किरकोळ घसरणीकडे कल दिसत आहे. सत्राच्या सुरुवातीला सेन्सेक्स सेन्सेक्स ८४ व […]
  • डिजिटल सातबारा, ८-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता December 8, 2025
    मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं डिजिटल सातबारा, ८-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं सातबारा उतारा, ८-अ उतारा आणि फेरफार यासाठी तलाठी किंवा ग्रा […]
  • मल्ल्या, नीरव मोदीसह १५ फरार आरोपींवर ५८ हजार कोटींचे कर्ज December 8, 2025
    मुंबई : केंद्र सरकारने मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्यासह १५ जणांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतेच लोकसभेत माहिती दिली की, ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या गुन्हेगारांवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे एकूण ५८,०८२ कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीच्या रकमेत ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतचे मूळ २६ […]
  • गुंतवणूक कशासाठी आणि कुठे? December 8, 2025
    उदय पिंगळे गुंतवणूक केल्याने काही कालावधीनंतर तुमच्या पैशांत वाढ होते. त्यामुळे तुमचे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करता येतं. गुंतवणुकीची सुरुवात लवकरात लवकर करणे कधीही चांगलंच. पहिली कमाई जेव्हा तुमच्या हातात पडेल त्याच दिवसापासून गुंतवणूक करणे योग्य होईल. अनेक कारणांसाठी गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुंतवणूक केल्याने पैशांमध्ये वाढ होते. महागाईवर मात करण् […]
  • क्रेडिट पॉलिसीनंतर निर्देशांकात तेजी... December 8, 2025
    डॉ. सर्वेश सुहास सोमण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची म्हणजेच पाव टक्क्यांची कपात करत तो ५.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर नवा रेपो रेट जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट ५.५० टक्क्यांवरून […]
  • अर्थविश्वात वाढतेय देशाची ताकद December 8, 2025
    महेश देशपांडे  अनेक आव्हानांना सामोरे जात भारताच्या अर्थव्यवस्थेने अखेर मोठी झेप घेतलीच. मात्र त्याच वेळी भारताच्या जीडीपी डेटामध्ये गंभीर चुका असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दाखवून दिले. याच सुमारास डिजिटल बँकिंगसाठी रिझर्व्ह बँकेने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. दुसरीकडे सोन्याच्या बाजारपेठेत सध्या भारताची वाढती ताकद पाहायला मिळत आहे. […]
  • पुतीन यांच्या भेटीचा मथितार्थ December 8, 2025
    आंतरराष्ट्रीय राजकारणात ऑप्टिक्सला प्रचंड महत्त्व असते. भारत आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यात भारताने हाच संदेश जगाला देण्याचा प्रयत्त्न केला आहे. पुतिन यांची भारत भेट ही समारंभपूर्वक दिखाऊपणाच्या अगदी पार पलीकडे जाणारी आणि दोन्ही देशांत असलेल्या अनेक वर्षांपासूनच्या संबंधांना आणखी बळकट करणारी आहे. अमेरिका आणि त्यांच्या मांडलिक देशांन […]
  • कोकणात मळभाचे सावट December 8, 2025
    वार्तापत्र : कोकण पूर्वी वर्षभरात कृषीची एक दैनंदीनी होती. आता तसे काही उरले नाही. धुक्यात रस्ते हरवतात. साहजिकच या वातावरणाचा परिणाम फळबागायतींवर दिसतो. यावर्षी आंबा, काजू पीक चांगले येईल अशी अपेक्षा कोकणातील बागायतदार शेतकरी बाळगून आहेत. आंबा, काजूंवर होणारी फवारणी, कीटकनाशक, खत, बागायतींची बेनावळ यावर हजारो रुपये खर्च होतात. कधी-कधी बागायतींवर होणाऱ्या खर […]
  • चक्राकार उपाय नकोत! December 8, 2025
    वाघ जितका गरजेचा आहे तितकाच माणूसही. गावाकडचा सर्वसामान्य माणूस प्रचंड तणावात जगतोय. शेतकरी, मजूर, आदिवासी बांधव त्यांच्या शेतात अगदी घरात वाघ किंवा बिबट्याचा प्रवेश होतो आहे. एका रात्रीत आयुष्याची कमाई नष्ट होते. प्रियजना गमावले जातात हे दुःख शब्दात मावणारे नाही. नुसतं दुःख व्यक्त करून चालणार नाही. आज ग्रामीण भागातले वास्तव खूप भयावह आहे. माणूस निसर्गाचा भा […]

 

 

Unable to display feed at this time.